आदिवासी शिक्षक बिऱ्हाड मोर्चा पंधरावा दिवस

 15 दिवस आहे काल आमचे पदाधिकारी मंत्रालयात गेले होते पण मंत्रालयात त्यांना सचिवच भेटले व झिरवड साहेब व खोसकर साहेब हे आमदार तिथे होते त्यांनी खूप प्रयत्न केला सचिवांना समजवण्यासाठी परंतु काहीही फरक पडला नाही व मंत्रालयात कोणतेही अधिकारी आदिवासी विकास मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे कोणीही भेटले नाही सचिव साहेब कोणाचीही एकही शब्द ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते ते म्हणाले की आम्ही बाह्यश्रोत पदभरती करणारच व हे सांगून आमचे पदाधिकारी काल रात्री तीन वाजता नाशिक येथे पोहोचले व नाराजी व्यक्त केली 

आम्हाला जर नोकरीवर हजर करून घेतले जाणार नाही आम्ही मोर्चा मागे घेणार नाहीत जीआर रद्द करून आम्हाला मागील वर्षी 24व 25 या सत्रातील आदेशत करावे आमचे एक कर्मचारी शिक्षक खोटरे सर हे अन्नत्याग उपोषणास बसले आहेत त्यांना आज बारावा दिवस आहे तरी शासनाने त्यांच्याबद्दल कोणतीही दखल घेतलेली नाही व शासनाला वाटते की ते ढोंगी आहेत अशा प्रकारचे वक्तव्य गव्हर्मेंट करत आहे आमच्या अन्यायाला कोणीच वाचा फोडत नाही तरी आम्हाला आश्वासन न देता आम्हाला आमची रोजी रोटी द्यावी व तात्काळ जीआर रद्द करून कामावर हजर करून घ्यावे.

आदिवासी शिक्षक बिऱ्हाड मोर्चा पंधरावा दिवस आदिवासी शिक्षक बिऱ्हाड मोर्चा पंधरावा दिवस Reviewed by 87 NPS News Nashik on जुलै २४, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.